अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अटक ; गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क,
भिवंडी – अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा घटक-२,भिवंडी यांनी पकडले.हा प्रकार गुंजन ढाबा,अंजुर फाट्याजवळ घडला. राजकिशोर धृतकृष्णा बेहरा सुभाष मोडक (वय ३१, रा. उडीसा) व सागर सुरेंद्र नायक ( वय २९, रा.शिरोना गाव, सेक्टर-१,नेरुळ, नवी मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिवंडीतील गुंजन धाब्याचे समोर, अंजुर फाट्याकडून वसई रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेजण अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखा घटक-२,भिवंडी सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी,पोलीस शिपाई इंगळे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघा आरोपींना पकडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे सॅक बॅगमध्ये गांजा,एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण १६,६८,५०४/- रु.किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगला असताना मिळून आले.
राजकिशोर धृतकृष्णा बेहरा व सागर सुरेंद्र नायक यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. || २६३/२०२४ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क),२० (ब) || (क) ,२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी हे करीत आहेत.