ठाणे, भिवंडीतून हद्दपार केलेल्या गुंडांस पुन्हा अटक, मनाई आदेशाचा केला भंग

Spread the love

ठाणे, भिवंडीतून हद्दपार केलेल्या गुंडांस पुन्हा अटक, मनाई आदेशाचा केला भंग

कोळसेवाडी पाेलिसांनी केली कारवाई

प्रकाश संकपाळ

पोलीस महानगर नेटवर्क,

कल्याण – ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ या शहरातून दीड वषार्करीता हद्दपार केलेल्या सूरज नानिकराम मंगलानी (२९, रा. कैलासनगर, कल्याण पूर्व) याला कोळसेवाडी पाेलिसांनी अटक केल्याची माहिती शनिवारी दिली. सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज मंगलानी याचेवर गुन्हे दाखल असून त्याच्या  गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त व कल्याण परिमंडळ -३ चे पाेलिस उपायुक्त यांनी आरोपीस ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरातून दीड वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश २९ एप्रिल, २०२२ राेजी दिले हाेते. त्याने याच आदेशाचा भंग करुन ताे कल्याण पूर्व येथील खडेगोळवली, कमलादेवी महाविद्यालयाजवळ फिरत असल्याची माहिती कोळसेवाडी पाेलिसांच्या पथकास मिळाली. २ मार्च, २०२४ राेजी रात्रौ ०२.१५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेऊन सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं.|| ३५८/२०२४ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सूरज नानिकराम मंगलानी (२९) यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हांडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon