बकरी ईदसाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांवर पोलिसांकडून छळ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

Spread the love

बकरी ईदसाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांवर पोलिसांकडून छळ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

रवि निषाद / मुंबई

मुंबई – येणाऱ्या ७ जून रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरा ईद (ईद-उल-अजहा) साजरा होणार आहे. या सणासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात बकरे देवनार मंडीमध्ये आणले जात आहेत. मात्र, या जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवून महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमधील पोलिसांकडून आर्थिक लाच घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सीमावर्ती भागांपासून ते धुळे, सांघवी, शिरपूर, मालेगाव, नाशिक (घोटी), कसारा, पिंपळगाव, चाळीसगाव, शाहपूर इत्यादी भागांतील पोलिसांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून बळजबरीने पैसे उकळले जात आहेत. याबाबत तक्रारी ट्विटरसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच पोलिसांना स्पष्ट आदेश दिले होते की, जनावरांची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही गाडीला अडवू नये. तरीदेखील अनेक ठिकाणी हे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत.

ऑल महाराष्ट्र खटीक असोसिएशनचे अध्यक्ष अकील ताडे यांनी यासंदर्भात गंभीर तक्रार नोंदवली असून, त्यांनी पोलिसांच्या भ्रष्ट कारभारावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी पोलिसांकडून लाच घेण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अकील ताडे यांनी सरकार व प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon