सलमान खानशी संबंध ठेवल्यामुळे झिशान किंवा बाबा सिद्दीकी जो पहिल्यांदा दिसेल त्याला संपवा – शिवकुमार गौतम

Spread the love

सलमान खानशी संबंध ठेवल्यामुळे झिशान किंवा बाबा सिद्दीकी जो पहिल्यांदा दिसेल त्याला संपवा – शिवकुमार गौतम

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीच्या जबाबात धक्कादायक खुलासा

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शिवा याच्या जबाबात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. सलमान खानशी संबंध ठेवल्यामुळे झिशान किंवा बाबा सिद्दीकी यांना मारण्याचे आदेश बिष्णोई गँगने दिला होता. याशिवाय बाबा सिद्दीकी किंवा झिशान पैकी जो आधी सापडेल त्याला संपवा अशीही सूचना बिश्नोई गँगने मारेकऱ्यांना दिली होती. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येतील मुख्य शूटर शिवकुमार गौतम याला मुंबई गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. २१ दिवसांच्या शोधानंतर गौतमला उत्तर प्रदेशातील बहराइच येथून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीदरम्यान कबुली जबाबामध्ये गौतमने (शिवा) १२ ऑक्टोबर रोजी हत्येचे नियोजन आणि अंमलबजावणीची चित्तथरारक माहिती दिली.

त्याने केलेल्या खुलाशानुसार, बाबा सिद्दीकीला गोळी मारल्यानंतर तो लगेच घटनास्थळावरून पळून गेला नाही. त्याऐवजी, गौतमने आपला टी-शर्ट बदलला आणि गर्दीत मिसळला. तासाभराहून अधिक काळ तो त्याच परिसरात असल्याची माहिती आहे. तो त्याच परिसरात असल्याची माहिती पोलिसांना नव्हती. शूटिंगचा गोंधळ संपल्यानंतर गौतमने कुर्ला स्थानकापर्यंत रिक्षा घेतली आणि त्यानंतर लोकल ट्रेनने ठाण्याचा प्रवास सुरू ठेवला. तेथून ते पुण्याला जाण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बसला. साधारण पहाटे ३ च्या सुमारास तो पुण्याला पोहोचला. ओळख टाळण्यासाठी त्याने आपला मोबाईल फोन टाकून दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे झाशीला जाण्यापूर्वी तो सुमारे एक आठवडा पुण्यात राहत होता. झाशीमध्ये तो पाच दिवस राहिला. त्यानंतर तो लखनऊला गेला. येथे त्याने एक नवीन फोन खरेदी केला आणि त्याच्या गुन्हेगारी साथीदारांशी पुन्हा संपर्क स्थापित केला. बहराइचला जाण्यापूर्वी गौतम ११ दिवस लखनऊला राहिला. जिथे तो त्याच्या साथीदारांनी तयार केलेल्या सुरक्षित घरात लपून बसला होता.

चौकशीदरम्यान गौतम म्हणाला, बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी किंवा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांची हत्या करण्याची सूचना दिली होती. जो पहिल्यांदा सापडेल त्याला मारण्याचे निर्देश दिले होते. अनमोल बिश्नोई हा बिश्नोई गँगमधील एक प्रमुख व्यक्ती आहे. सुरुवातीला गौतमने परदेशात पळून जाण्यापूर्वी उज्जैन आणि नंतर वैष्णोदेवीला पळून जाण्याची योजना आखली, परंतु ती योजना झाली नाही. पळ काढून जात असताना गौतम सहप्रवाशाचा फोन वापरून अनुराग कश्यप या अन्य संशयिताच्या संपर्कात राहिला. त्यांनी शुभम लोणकर आणि झिशान अख्तर या सहकाऱ्यांसोबत नियोजनाच्या संपूर्ण टप्प्यात समन्वय साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon