राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला:कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.९१% निकाल, मुंबईचा सर्वात कमी ९१.९५% निकाल
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्यात बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आली. यंदा राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वात अधिक निकाल कोकण ९७.९१ तर सर्वात कमी मुंबई ९२.९५ निकाल लागला आहे.यावेळी अनुराधा ओके, माणिक बांगर उपस्थित होते
पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला.
मागील वर्षीचा बारावीचा निकाल हा ९१.२५ टक्के होता तर यावर्षी तो ९३.३७ टक्के इतका आहे. म्हणजेच यावर्षीच्या निकालात २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील ९ विभागातील निकालाची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
कोकण – ९७.५१ टक्के
नाशिक – ९४.७१ टक्के
पुणे – ९४.४४ टक्के
कोल्हापूर – ९४.२४ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९४.०४
अमरावती – ९३ टक्के
लातूर – ९२.३६ टक्के
नागपूर – ९२.१२ टक्के
मुंबई – ९१.९५ टक्के