गर्लफ्रेंडशी फोनवर बोलता बोलता भांडण टोकाला गेलं, रागाच्या भरात १८ वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या; ठाण्यात खळबळ

Spread the love

गर्लफ्रेंडशी फोनवर बोलता बोलता भांडण टोकाला गेलं, रागाच्या भरात १८ वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या; ठाण्यात खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – गर्लफ्रेंडशी फोनवर भांडण झाल्यानं तरुणानं रागाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात मुंब्रा भागातील अमृत नगरमध्ये घडलीय. प्रेसयीशी भांडणानंतर तरुणाचा मानसिक संतूलन ढासळल्यानं त्यानं हे भयंकर पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समजतंय. घटना घडल्यानंतर घरातील कुटुंबातील सदस्यांना कळलं तेंव्हा मोठी खळबळ उडाली. त्यांनी तातडीनं पोलिसांना घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस तरुणाच्या म़त्यूशी भांडणाशिवाय आणखी काही कारण जोडले आहे का? याचा तपास करत आहेत. मुंब्रा येथील अमृत नगरमध्ये एका १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. फोनवर प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलत होता. या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की, मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणाने स्वतःला संपवलं. घरातील सदस्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, भांडणाचं नेमकं कारण काय होतं? त्याच्या आत्महत्येमागे अजून काही कारण आहे का? याचा तपास करण्यासाठी पोलिस तरुणाचे कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती तपासत आहेत.दरम्यान, एका फोन कॉलमुळे एका तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणांनी मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी मदतीची गरज असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon