सातीवली येथे दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रकने चिरडले, सुखी संसाराचा क्षणात चुराडा

Spread the love

सातीवली येथे दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रकने चिरडले, सुखी संसाराचा क्षणात चुराडा

योगेश पांडे/वार्ताहर 

पालघर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. बाईकवर स्वार पत्नी पत्नीला ट्रकने चिरडले आहे. या भीषण अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रकांत सुतार (३२) आणि लक्ष्मी चंद्रकांत सुतार (२९) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देहरे गावचे रहिवासी असलेले चंद्रकांत सुतार व त्यांची पत्नी लक्ष्मी चंद्रकांत सुतार हे दाम्पत्य दुचाकीवर स्वार होऊन मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते. सुतार दाम्पपत्य जव्हारच्या दिशेने जात असताना मुंबई- अहमदाबाद महामार्गावर गुजरात वाहिनीवरील सर्व्हिस रोड येथे त्यांची दुचाकी रस्त्यावर असलेल्या खडीवर घसरली. यावेळी दोघे दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडले, याचदरम्यान मागून आलेल्या आलेल्या एका ट्रकने धडक दिली आणि दोघेही चिरडले गेले. यामध्ये दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

राष्ट्रीय महामार्गावर सातिवली नजीक शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून प्रसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दाम्पत्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon