स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यातील ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी प्राप्त बदली आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता १० वी आणि १२ वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्ण हे सध्या पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था असलेल्या यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. तसेच, राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या चार आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.
१) राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२) प्रकाश खपले – आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३) डॉ.मंजिरी मानोलकर – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
४) त्रिगुण कुलकर्णी – उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची अध्यक्ष, एसएससी आणि एचएससी बोर्ड, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.तर
५) अंजली रमेश -मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.