कल्याणमध्ये दारूपार्टीत मित्रानेच केली मित्राची हत्या
प्रकाश संकपाळ
कल्याण – दोन मित्रांना चायनीज व्यवसाय भागीदारीत सुरू करायचा होता, दोघांनी धंदा सुरूही केला त्यानिमित्ताने दोघांनी दारूची पार्टी ठेवली होती, त्या पार्टीत त्यांनी दारू अतिसेवन केल्याने त्यांच्यात वाद झाला, वाद एवढा विकोपाला गेला की,एकाने दुसऱ्याची हत्या केली.
मध्यरात्री आडीवली परिसरात ही घटना घडली असून बेफाम झालेल्या परेश शिलकर या आरोपीने वाजीद सैय्यद याची हत्या केली. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ व मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मयत सैय्यद चं शव हे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. आरोपी परेश शिलकर यास मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.