कल्याणमध्ये कृषीउत्पन्न बाजार संकुलातील वाहनांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बाजारपेठ पोलिसांनी केले जेरबंद
प्रकाश संकपाळ
कल्याण – येथील कृषिउत्पन्न बाजार संकुलात दररोज लाखोंची उलाढाल होत असते. या बाजारपेठत भाजीपाला, फळे, अन्नधान्य, फुले व इतर सामानाची मोठया प्रमाणावर आवक जावक होत असते याचाच फायदा घेण्यासाठी काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहीती बाजारपेठ पोलीस ठाण्यातील मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपवते, पोलीस हवालदार घुगे व त्यांच्या पथकाने १७ जानेवारी रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास कल्याणच्या कृषिउत्पन्न बाजार संकुलातील धान्य बाजार जवळ येथे सापळा रचून आरोपी आजीम रौफ गाझी (२५), रा.रेतीबंदर, कल्याण, अरफात युसूफ शेख ऊर्फ काल्या (२०), अनवर शौकत शहा (२४) व अरबाज इस्माईल शेख ऊर्फ बटला (२४) रा.गोविंदवाडी, कल्याण यांना मोठया शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते कृषीउत्पन्न बाजार संकुलातील धान्य घेऊन येणाऱ्या वाहनांवर व व्यापारी इसमांवर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले.
सदर आरोपींकडून ऑटो रिक्षाक्र. एमएच -०५-डीक्यू-३५५९, दोन लोखंडी सुरे, एक लोखंडी चाकू,रियल कंपनीचा मोबाईल फोन, मिरची स्प्रे बाटली असे प्राणघातक साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा रजि.क्र.१६३/२०२३ भा.द. वि. कलम ३९९,४०२,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ (१) (ब) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१),१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ आरोपीना अटक करण्यात आली असून उर्वरित ३ फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दैनिक पोलीस महानगर शी बोलताना सांगितले.