मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेनं प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय युवकाचा तोल जाउन खाडीत पडून मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका युवकाचा तोल गेल्यानं तो थेट विटावा खाडीत पडल्याची घटना घडली आहे. हा युवक मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेने प्रवास करत होता. मात्र, विटावा खाडी जवळ ट्रेन येतात त्याचा तोल गेला आणि तो थेट खाडीत पडला आहे.१९वर्षाचा हा युवक कळव्यातील, गोलाईनगर येथे राहणार आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच युवकाचा शोध घेण्यासाठी अग्निशमाक दलाचे जवान जवान आणि, आपत्ती दलाचे जवान तसेच स्थानिक मच्छीमार घटनास्थली दाखल झाले आहेत. २ बोटींच्या सहाय्याने युवकाचा शोध घेण्याचं काम सुरु करण्यात आले.मात्र अंधार पडल्यानं रात्री शोध थांबवण्यात आले.