मंत्रालय परिसरात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; वारंवार फेऱ्या मारूनही कामं होत नसल्याने व्यथित
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मंत्रालयात यापूर्वी आत्महत्या होत असल्याने त्या थांबविण्यासाठी संरक्षक जाळी बसविण्यात आलेली आहे.तरीसुद्धा आत्महत्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. मंत्रालयाच्या वारंवार फेऱ्या मारूनही काम होत नसल्यानं कंटाळलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मजल्यावरील एका खिडकीवर बसून हा व्यक्ती उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार जेव्हा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना समजला तेव्हा, त्यांनी त्याचं मन वळण्याचा प्रयत्न करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आलं आहे. मंत्रालयात अनेक चकरा मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद नारायण पाटील असे आहे. शालेय शिक्षण विभागात ते कामानिमित्त आले होते. वारंवार फेऱ्या मारूनही काम होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. कराड चिपळून रस्त्यात जागा गेली आहे. त्याबाबत ते आले असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुढे काय घडतं हे पाहणं तितकंच महत्वाचे आहे.