अंघोळीला विरोध करताच पतीने पत्नीवर चाकूने केले वार; पत्नीची स्थिती गंभीर, पतीला पोलीसांकडून अटक

Spread the love

अंघोळीला विरोध करताच पतीने पत्नीवर चाकूने केले वार; पत्नीची स्थिती गंभीर, पतीला पोलीसांकडून अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – पावसाळा तोंडावर आला तरी राज्यासह मुंबईतही सध्या पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सध्या पाणीकपात सुरू हेच कारण एका महिलेच्या जीवावर बेतलं. पाणी संकटामुळे मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेचा जीव जाता जाता राहिला. पाणी कपातीमुळे पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असून यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पती परमात्मा गुप्ता – ४२ याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निर्घृण हल्ल्यामध्ये मीरा गुप्ता नावाची महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाणीकपात सुरू आहे. सर्वांच्याच घरात पाण्याचे वांदे होत आहेत, मात्र तेच कारण एका महिलेच्या जीवासाठी घातक ठरले. पालिकेने पाणीकपात केल्याने मीरा गुप्ता यांच्या घरातही पाणी कमी होते. शनिवारी दुपारी त्यांचे पती परमात्मा गुप्ता हे घरी आले. त्यांना अंघोळीला जायचं होतं. मात्र पालिकेने पाणीकपात केल्याने तसेच घरात पाणी कमी असल्याने पत्नी मीरा यांनी त्यांना अंघोळ करू नका असे सांगत विरोध दर्शवला. मात्र यामुळे परमात्मा गुप्ता संतापले आणि त्यांनी पत्नीवर हल्ला केला. स्वयंपाक घरातील कांदा चिरण्याचा चाकू घेऊन त्यांनी मीरा यांच्या पोटा सपासप तीन वार केले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिस घटनास्थलू पोहोचले आणि त्यांनी परमात्मा गुप्ता यांना अटक केली. त्यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon