दुर्घटना की आत्महत्या ? नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून ५ जणांचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरु

Spread the love

दुर्घटना की आत्महत्या ? नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून ५ जणांचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरु

योगेश पांडे / वार्ताहर 

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याती सुरगाव शिवार इथं धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचा व पथकाचे मदतीने पाण्यातून मृतदेह करण्यात आले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे. ही दुर्घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून ५ जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानं ही दुर्घटना आहे की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसर हादरुन गेला आहे. तसेच यामुळं हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. एहतेशाम अन्सारी (२६),रोशनी चौधरी (३२),अंजली चौधरी (२५) ,मोहित चौधरी (१०),लक्ष्मी चौधरी (८) अशी मृतांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon