पाचशे रुपयांच्या वादातून भावानेच केली सख्या भावाची भोसकून हत्या; १२ तासाच्या आता बाजारपेठ पोलीसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – कल्याणमध्ये आणखी एक खून झाल्याची घटना समोर आली आहे. एका भावाने त्याच्या सख्या भावाचाच बळी घेतला आहे, तेही अवघ्या ५०० रुपयांसाठी. पाचशे रुपयांच्या वादातून एका इसमाने त्याच्या सख्ख्या भावाची धारदार चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची एक घटना कल्याणमध्ये आधीच गाजत आहे. त्यातील आरोपीने पत्नीसह त्या मुलीच्या मृतदेहाची वाट लावली होती. हा खटला संपूर्ण राज्यात गाजत असून कल्याणमध्ये तर अतिशय खळबळ माजलेली आहे.हे कमी की काय म्हणून आता त्याच कल्याणमध्ये आणखी एक खून झाला आहे. एका भावाने त्याच्या सख्या भावाचाच बळी घेतला आहे, तेही अवघ्या ५०० रुपयांसाठी. पाचशे रुपयांच्या वादातून एक इसाने त्याच्या सख्ख्या भावाची धारदार चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सलीम शमीम खानने आपल्या लहान भाऊ नईम शमीम खानचा, चाकूने वार करत खून केला. पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहतं. या कुटुंबात आईसह तीन भाऊ एकत्र राहतात. आरोपी सलीम शमीम खान, मृत नईम शमीम खान आणि आणखी एक भाऊ असे तिघे भाऊ घरात राहतात. मात्र खुनाची ही घटना घटना घडली त्या रात्री, नईमने आपले पाचशे रुपये घेतले आहेत, असा संशय सलीम याला आला. त्यात पैशांच्या मुद्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे संतापलेल्या सलीमने स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने नईमवर वार केले. या हल्ल्यात नईमचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर सलीम फरार झाला. मात्र,कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याने तातडीने तपास मोहीम सुरू करून आरोपीला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, किरकोळ कारणावरून इतका मोठा अनर्थ घडल्यामुळे समाजात संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.