राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

Spread the love

राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – महायुती सरकारच्या काळात सुरू झालेल्या राज्यातील कुठल्याही योजना बंद करण्यात आल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आजही सुरू आहेत. शिवभोजन थाळी असेल, आनंदाचा शिधा असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल ह्या योजना आजही सुरू आहेत, यापुढे देखील सुरूच राहतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. राज्यातील एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेंनी दिली.एकनाथ शिंदेंनी उद्योग, मुंबईचा विकास, रोजगार, गावाकडची शेती, मुख्यमंत्रीपदावरुन नाराजी, शासनाच्या योजना, नागपूरचा हिंसाचार… या प्रश्नांवर उत्तरे दिली. तसेच, राज्यातील महायुती सरकार हे फेव्हिकॉल का जो है.. अजिबात तुटणार नाही, असेही त्यांनी म्हटले. आपण महायुतीमध्ये नाराज आहेत का, सातत्याने गावाकडे जाता याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मी गावी जातोच. पण, काहीजण म्हणतात मी हेलिकॉप्टरने शेती करतो. कारने गावी जायला ६ ते ७ तास लागतात. या ६ ते ७ तासांत मी १० हजार सह्या करु शकतो, सह्या करण्यात माझा रेकॉर्ड आहे. गर्दीमध्ये माणसांच्या पाठीवरही मी कागद धरुन सही करतो, या सहीने लोकांचे कामं करतो, वैद्यकीय विषय असेल किंवा इतर कामासाठी मी सह्या करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले. मी गावाकडे शेती चांगलीच फुलवली आहे, गावात बांबूची शेतीही मी केली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाकडील शेतीचा अनुभव सांगितला. तसेच, ३० जून २०२२ मी.. असे म्हणत एकनाथ शिंदेंनी आपण २०२२ मध्येही राजकीय बांबू लावल्याचे सूचवले.

साताऱ्यात आपण न्यू महाबळेश्वर करत आहोत, आत्तापर्यंतचे हिल स्टेशन हे ब्रिटीशकालीन आहे. पण, आता आपलं सरकार करतंय हे पहिल्यांदाच होत आहे. आम्ही रस्ते धुतले, मुंबईची तिजोरी नाही धुतली, नालेसफाई केली, तिजोरीची नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील उद्योजकांसाठी रस्ते, पाणी, वीज याची सोय करुन देत आहोत. उद्योजकांना जो त्रास देईल, तो तुरुंगात जाईल. खंडणीखोरांना आता आम्ही डायरेक्ट जेलमध्ये टाकणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. राज्यातील सगळ्या योजना सुरू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती आणखी सुरू आहे, पण काहीजण म्हणत होते ही योजना फसवी आहे, खरं नाही. पण, या योजनेसह, लेक लाडकी योजना, शासन आपल्या दारी व इतरही योजना सुरू आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा ह्या योजनाही बंद नाहीत, त्या चालूच आहेत. ज्या पात्र बहिणी आहेत, त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहि‍णींना दिला. मात्र, निकषात बसणाऱ्या लाडक्या बहि‍णींनाच याचा लाभ मिळेल, जर चारचाकी गाडी असेल किंवा निकषात नसेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon