बेरोजगारीचा कहर ! ३०० जागांसाठी ३००० तरुण, एअर इंडियाच्या गेटपुढे मोठा गोंधळ ; गर्दीवर पोलिसांचं नियंत्रण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सरकारी नोकर होण्यासाठी आज महाराष्ट्रातील लाखो तरुण दिवसरात्र धडपड करत आहेत. सरकारी नोकरी भेटली नाही तरी खासगी क्षेत्रात चांगला पगार देणारी एखादी प्रतिष्ठेची नोकरी मिळावी, अशी अशा घेऊन हे तरुण कष्ट उपसत आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक पदांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ उडाल्यामुळे या तरुणांमध्ये हतबलता आलीय. म्हणूनच एखाद्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जात असेल तर तरुणांची झुंबड उडताना दिसतेय. असाच काहीसा प्रकार मंगळवारी मुंबईतील एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीत पाहायला मिळाला. या कंपनीकडून एकूण २७०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात ३०० जागांसाठी तब्बल ३००० तरुण गोळा झाल्यामुळे येथे चांगलाच गोंधळ उडाला. एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीकडून सध्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २७०० जागा भरल्या जाणार आहेत. टप्प्या-टप्प्याने ही भरती राबवली जाणार आहे. याच भरतीच्या पहिल्या टप्प्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. या पहिल्या टप्प्यात एकूण जागांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. भरती फक्त ३००० जागांसाठी होती. पण त्यासाठी तब्बल ३००० मुलं जमा झाली होती. अपेक्षेपेक्षा जास्त मुलं आल्यामुळे येथे काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.
एअर इंडियामध्ये कामगार भरती होत असल्याने सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थींची गर्दी झाली होती. त्यामुळे येथे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे. ३००० हजार मुले एकत्र जमले होते. त्यामुळे थोडासा गोंधळ होता. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या त्या ठिकाणी गर्दी नाही. मुंबई एअरपोर्ट गेट क्रमांक ५ बाहेर हा गोंधळ झाला. दरम्यान,या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण फक्त ३०० जागांसाठी तब्बल ३००० मुलं जमा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरुणांच्या गर्दीचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय.