काँग्रेस वैचारिकदृष्ट्या दुभंगली, पक्षात पाच सत्ताकेंद्रे, संजय निरुपम यांचा हल्लाबोल. गुरुवारी पत्रकार परिषद घेणार

Spread the love

काँग्रेस वैचारिकदृष्ट्या दुभंगली, पक्षात पाच सत्ताकेंद्रे, संजय निरुपम यांचा हल्लाबोल. गुरुवारी पत्रकार परिषद घेणार

योगेश पांडे /वार्ताहर 

मुंबई – काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर नेते संजय निरुपम यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. आपली हकालपट्टी होण्यापूर्वीच आपण पक्षाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष संरचनात्मक आणि वैचारिकदृष्ट्या दुभंगला आहे. काँग्रेस पक्षात पाच सत्ताकेंद्रे आहेत. पाचही केंद्रांवर लॉबी असून जे उपस्थित राहत नाहीत त्यांची चिंता वाढली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसमधील संघर्षामुळे मात्र जनतेचा

त्रास वाढत आहे. गेल्या पाच वर्षांपासून गंभीर वाटत होते. कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. धर्मनिरपेक्षतेमध्ये धर्माला विरोध नसावा, सर्व धर्मांमध्ये सामंजस्य असायला हवे. काँग्रेसने नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेचा विचार स्वीकारला. डावे लोक थेट राम लल्लाला विरोध करतील. आता त्याच मार्गावर काँग्रेस पुढे सरकली आहे, त्यामुळे रामलल्ला विराजमान यांच्या कार्यक्रमाला काँग्रेसने थेट विरोध केला आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने संजय निरुपम संतापले होते. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला खिचडी चोर म्हणत काँग्रेस नेत्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन केले होते. तिकीट जाहीर झाल्यापासूनच संजय निरुपम यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले होते. आता ते शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon