खदान मालक आणि आदिवासींमधील संघर्ष पेटला

खदान मालक आणि आदिवासींमधील संघर्ष पेटला

– गावातील आदिवासी टिटवाळा पोलीस ठाण्यात झाले जमा

दिनेश जाधव : कल्याण

कांबा गावातील दगड खदानीचा विषय पेटला असून खदान मालक आणि पोलीस आदिवासींवर खोटे आरोप करून या खदानीपासून ७० ते ७५ मिटरवर असलेले पाडे उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कांबा गावातील आदिवासी करत आहेत. काल तीन आदिवासी तरुण मुलांना पोलिसांनी अटक केल्याने गुरुवारी सकाळी टिटवाळा पोलीस ठाण्यात या आदिवासी नागरिकांनी एल्गार केला.
कांबा गावात २०१७ पासून दगड खदानी संदर्भात आवाज उठवला जात आहे. या खदानीच्या स्फोटाचा आवाज रात्री – अपरात्री त्रासदायक होत असून यामुळे घरांना अक्षरशः भेगा पडत असल्याचे या आदिवासींनी सांगितले. इतकेच नव्हे तर दगड खदानीच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार होत असून गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत देखील या खदानीतील धूळ जात असल्याचा आरोप या आदिवासींनी केला आहे. यावेळी गावातील तीन तरुण मंडळींना पोलिसांनी खदान मालकांच्या सांगण्यावरून अटक केली असून गुरुवारी आम्ही या विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार होतो अशी माहिती गावातील आदिवासीयांनी दिली. नेमकी याची माहिती खदान मालकांना मिळाली. त्यामुळे बुधवारी रातोरात तीन तरुण कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी सकाळी गावातील सर्व आदिवासी टिटवाळा पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांना सोडलं नाही तर आम्हाला पण अटक करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: